कोंढवा – उपनगरात वाढलेली वाहने, अरुंद रस्ता, वाढलेले बेकायदेशीर अतिक्रमण रस्त्यावरचे खड्डे यामुळे गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे या रस्त्यावर तळ्याचे स्वरूप येतं आहे, कात्रज कोंढवा रस्त्यावर पावसाळी गटारे अस्तित्वात नसल्याने ठिकठिकाणी तळे साचत आहेत. परिणामी या दोन्ही रस्त्याचे सौंदर्य हरवले आहे. महापालिकेच्या तिजोरीत कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी १४० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे मात्र काम कधी सुरू होणार या प्रश्नाचे उत्तर हे अनुत्तरीत आहे. २०१८ पासून भूसंपादनाचा प्रश्न रेंगाळत असून तो मार्गी कधी लागणार या प्रतीक्षेत येथील रहिवासी आहेत, दैनंदिन व्यवहारासाठी हा रस्ता धोकादायक बनला असून २४ तास जड वाहने जातात.
शिवाय अस्ताव्यस्त लावलेली वाहने यामुळे कात्रज कोंढवा रस्ता आणि शत्रुंजय रस्ता हा वाहतूक कोंडीसह अतिक्रमण च्या विळख्यात सापडला आहे. वाढलेली रहदारी याला प्रमुख कारण असून या ठीकाणी सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास वाहतूक पोलीस उपस्थित नसतात. या ठीकाणी वाहतूक कोंडी ही नित्याचीच झालेली पाहायला मिळते. सामान्य नागरिकांना चालताना त्रासाला सामोरं जावे लागते. अनधिकृत टपऱ्या, फ्रंट मार्जिन वर कारवाई होत नसल्याचे चित्र असून अतिक्रमण अधिकारी यावर कोणतीही कारवाई करत नाहीत, हा रस्ता वाहन चालवण्यासाठी अत्यन्त धोकादायक बनला असून पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ चं नसल्याचे समोर आले आहे. जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. सुख सागर नगर, खंडोबा मंदिर रस्ता, अंबामाता मंदिर रस्ता, साळवे गार्डन परिसर, चोरडिया कॉर्नर, नाना नानी पार्क आदी परिसरात रस्त्यावर बेभानपणे वाहने पार्क केली जातात परिणामी रस्ता अरुंद सह धोकादायक बनला आहे, या भागातील शाळा, महाविद्यालय, क्लास, नर्सरी मुलांना ने आण करणाऱ्या पालकांनी याबाबत संताप व्यक्त केला, या रस्त्यावर टँकर आणि जड वाहनाच्या वेगावर नियंत्रण राहिले नाही याला वाहतूक पोलीस जबाबदार असून ते अनेक वेळा अनुपस्थित असतात.
दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते ऐवजी कनिष्ठ दर्जाचा कच्चा माल वापरून नागरिकांच्या कररुपी पैशांची उधळण सुरू आहे. लाखो रुपयांची निविदा काढून केवळ ठेकेदारांचा फायदा होत आहे. गंगाधाम शत्रुंजय मंदिर रस्ता हा मुख्य खात्याच्या प्रकल्प विभागा अंतर्गत येतं असून मुख्य खात्याचे प्रमुख हे अनिरुद्ध पावसकर आहेत त्यांना वेळीवेळी या रस्त्याचे छायाचित्र बातमीदारा कडून मिळतं असतात. या रस्त्याची गुणवत्ता तपासणे आवश्यक असून रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दररोज किरकोळ अपघाताना सामोरे जावे लागत आहे, जड वाहने ही शाळेच्या वेळेत जातं असल्याने त्यावर वाहतूक विभागाचे नियंत्रण राहिले नाही.
महापालिका प्रकल्प विभाग अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. तर अभियंता प्रकल्प विभाग मयूर जाधव यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आई माता मंदीर पासून ते वाय जक्शन पर्यंत पावसाळी लाईन टाकण्याचे काम सुरू होणार असून पावसाळ्या नंतर हे काम सुरू होईल.

रॅशनल टाईम्स हे डिजिटल बातमी प्रसारित करण्याचे माध्यम श्री.सुनिल चंद्रकांत शेवरे यांच्या मालकीचे असून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या रानडे इन्स्टिटयूट वृत्तपत्र व संज्ञापन विभाग येथे पत्रकारि तेचे शिक्षण पूर्ण केले आहे.
























