पुणे – मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम म्हणत कबुतर प्रेमींना ( जैन नागरिकांना ) कडक शब्दात चांगलेच सुनावले असून आमच्यासाठी लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. शांतीचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या कबुतरांवरून मुंबईत कमालीचा वाद पेटलेला असताना मुंबई उच्च न्यायालयात याविषयी सुनावणी संपन्न झाली.
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना अन्न, पाणी देण्याची बंदी कायम ठेवली. तज्ज्ञ समिती तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिलेले आहेत. मुंबई हायकोर्टाच्या आणि सरकारच्या निर्देशाचं पालन करत पालिकेकडून मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्यात आले होते. मात्र यावरुन मुंबईत चांगलाच गदारोळ माजला. बुधवारी तर जैन समाजाने रस्त्यावर आक्रमक आंदोलन करत दादरमध्ये लावण्यात ताडपत्री फाडून टाकली. या वादावर गुरुवारी सुनावणी पार पडली असून कबुतरांना अन्न, पाणी देण्याची बंदी कायम ठेवली आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी ही बुधवारी होणार आहे.

रॅशनल टाईम्स हे डिजिटल बातमी प्रसारित करण्याचे माध्यम श्री.सुनिल चंद्रकांत शेवरे यांच्या मालकीचे असून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या रानडे इन्स्टिटयूट वृत्तपत्र व संज्ञापन विभाग येथे पत्रकारि तेचे शिक्षण पूर्ण केले आहे.
























