पुणे – मसाज व्यवसाय हा तसा शारीरिक विश्रांती आणि तंदुरुस्तीसाठी म्हणून प्राचीनकाल पासून प्रसिद्ध आहे परंतु बदलत्या या जगात या व्यवसायाला जणू देहविक्रीचा शाप लागल्याचे दिसते आहे. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पूण्याला आज या व्यवसायाच्या आड देह विक्री होत असेल तर आपली यंत्रणा किती कुचकामी आणि निष्क्रिय म्हणावी लागेल. पोलीस प्रशासनात याबाबत इतक्या मोठया प्रमाणात उदासीनता का? याबद्दल कोणी बोलायला तयार नाहीत, एलआयबी यंत्रणेला माहित नसावे हे अशक्य आहे.
सॅलिसबरी पार्क हा पुण्यातला उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो या परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून मसाज सेंटर च्या नावाखाली देहविक्री होत असल्याचे समोर आले आहे, युनिटी बेकरी समोरील एका सोसायटीत युगंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर या नावाखाली हा प्रकार सुरू होता. तर मुकुंद नगर परिसरातील पंकज हॉटेल वरील एका कमर्शीयल इमारतीत दिया आयुर्वेदिक मसाज सेंटर नावाखाली देह विक्री सुरू होती, प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी कारवाई केली असून काही महिलांना अटक करण्यात आली आहे. स्वारगेट पोलीस वरिष्ट निरीक्षक यशवंत निकम यांचे मार्गदर्शना खाली तपास सुरू आहेत.
देहविक्रीचे हे जाळे मोडून काढण्यासाठी पोलीस यंत्रणा सकारात्मक पाऊल का उचलत नाही हा पडलेला प्रश्न आहे. समाजात सर्व समाज घटक चांगल्या प्रकारे गुण्या गोविंदाने राहत असताना समाजविघातक कृत्याने परिसराची बदनामी यासह समाजाचे नुकसान होते. या भागात मोठ्या प्रमाणात इंग्रजी मराठी माध्यमाच्या शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस आहेत. यामुळे भावी पिढीला आपण काय म्हणून आदर्श देणार आहोत, अशा घटना घडायलाचं नको यासाठी कोणती यंत्रणा काम करणार आहे की नाही याचा आपण विचार करायला हवा. प्रत्येक वेळी कारवाई होते आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या प्रमाणे तोच प्रकार घडतो. जागृत समाज घडवायचा असेल तर आपण स्वतः या साठी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनाशी संघर्ष करून आपली सुरक्षितता वाढवून घ्यायला हवी.
स्वारगेट पोलीस स्टेशन आणि मार्केट यार्ड पोलीस स्टेशन अंतर्गत विविध प्रकारचे गुन्हे नोंद होत असतात. हद्दीतील झोपडपट्टी परिसरामुळे जास्त गुन्हेगारीचे प्रमाण असून या अंतर्गत घडून येणारे गुन्हे कमी होण्या तयार नाहीत, वरिष्ट निरीक्षक बदलतात गुन्ह्यांच प्रमाण आहे, त्याच प्रमाणात राहते, याला नागरिकांची मानसिकता सुद्धा तितकीच जबाबदार आहे, पोलीस प्रशासन हे नागरिकांच्या सुरक्षे साठी असून त्यांना न घाबरता आपण मैत्री केली पाहिजे तरच आपण आपला परिसर सुरक्षित ठेवू शकतो.

रॅशनल टाईम्स हे डिजिटल बातमी प्रसारित करण्याचे माध्यम श्री.सुनिल चंद्रकांत शेवरे यांच्या मालकीचे असून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या रानडे इन्स्टिटयूट वृत्तपत्र व संज्ञापन विभाग येथे पत्रकारि तेचे शिक्षण पूर्ण केले आहे.
























