पुणे – पंजाब राज्यातील अनेक भागांत आलेल्या महापुरामुळे स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, असंख्य नागरिक बेघर आणि अन्न-पाण्याविना संकटात सापडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर “माणुसकी हीच खरी ताकद” या तत्त्वाधिष्ठित भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाणी, गहू, तांदूळ, कांदे, बटाटे, डाळी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची मदतगाडी पंजाबकडे रवाना करण्यात आली.
पंजाब पूरग्रस्त मदत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली. राष्ट्रवादीचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष नांगरे, शोभा नांगरे तसेच मार्केट यार्डमधील व्यापारी व आडत बांधवांच्या व मित्र परिवाराच्या माध्यमातून ही मदत पाठविण्यात आली. पुणे शहरातून आलेली सर्व मदत पुण्यातील गुरुद्वाराच्या माध्यमातून पंजाबला पाठवली जाणार आहे.
यावेळी भोलासिंग अरोरा, छबिल भाई पटेल, इस्माईल खान, राकेश कामठे, महेश हांडे, दिलीप अरुंदेकर, शंतनू जगदाळे, सुशांत ढमढेरे, गणेश पानसरे, रूपेश आखाडे, गौरव कापरे, समीर पटेल, शारुख खान, सलीम मुल्ला, प्रवीण जगताप, निलेश शिंदे, नाना कुटे, तेजस सोनवणे, उमेश कुंभार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रॅशनल टाईम्स हे डिजिटल बातमी प्रसारित करण्याचे माध्यम श्री.सुनिल चंद्रकांत शेवरे यांच्या मालकीचे असून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या रानडे इन्स्टिटयूट वृत्तपत्र व संज्ञापन विभाग येथे पत्रकारि तेचे शिक्षण पूर्ण केले आहे.
























